दूधगंगा धरण व्यवस्थापनेकडून सतर्कतेचा इशारा

राधानरागरी प्रतिनिधी : दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज रोजी पाण्याने सरासरी पाणी पातळी गाठलेली आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून पुढील चोवीस तासांमध्ये धरण पायथा विद्युत निर्मिती केंद्र सुरु करून नदीमध्ये 1600 घनफूट प्रतिसेकंद(क्यूसेक्स) पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.