अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा!" मुसळधार पाऊसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
मुंबई: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने रौद्ररूप धारण केले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचले असून सुरक्षेचा उपाय म्हणून 'मुंबई-पुणे एक्सप्रेसवे' आणि जुना हायवे दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत विशेष निवेदन दिले आणि नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.





