कोल्हापुरात स्मार्ट मीटरविरोधात ठाकरे गट आक्रमक! 'जबरदस्ती थांबवा, अन्यथा...'; महावितरणला थेट इशारा
कोल्हापूर/ प्रतिनिधी : शहरात महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरला आहे! "नागरिकांना विश्वासात न घेता सुरू असलेली ही हुकूमशाही आणि मनमानी जोडणी तात्काळ थांबवा," असा आक्रमक पवित्रा घेत ठाकरे गटाने महावितरणला थेट आणि कडक इशारा दिला आहे.





